राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची विचारविनिमय बैठक संपन्न
मंगळवेढा(प्रतिनिधी):-
मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काग्रेस अजितदादा गटाची विचार विनिमय बैठक पार पडली असूनू या बैठकीत आ.समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रादी काग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्याचा आग्रह दिसून आला.
विधानसभा होणाऱ्या निवडणुकी संदर्भात काय भूमका घ्यावी याबाबत कार्यकर्त्याना विचारणा करण्यात आली असता 2021 च्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालकेंना तन, मन, धनाने मदत करूनही त्यानंतरच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे प्रयत्न करून शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना पदावरून हटविले. त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी रात्र आणि दिवस करून निवडणुकीमध्ये काम केले त्या पदाधिकायांवरती गुन्हे दाखल करण्याकरिता पोलिस स्टेशनमध्ये फोन केले. त्यानंतरच्या काळामध्ये साखर कारखाना निवडगुकीमध्ये समविचारी आघाडी स्थापन करून सर्वानी एकत्रितपणे काम करून निवडणूक जिंकली व त्यानंतरच्या काळामध्ये साखर कारखाना स्वीकृत सदस्य निवड नाव सुचवताना कोणाशीही चर्चा न करता भगीरथ भालके यांनी नाव सुचविले व गेली 2 वर्ष त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क ठेवला नाही व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत.त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांना पाटिंबा देण्यास विरोध दर्शविला.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी महायुती सरकार मध्ये सामील झाल्यानंतर मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, विशरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा सुशोभीकरण करणे तसेच आतार- बागवान - तांबोळी स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, भीमनगर येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे तसेच मंगळवेढा शहरामध्ये अद्यावत संस्कृतिक भवन बांधणे,शहरातील विद्यर्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास कंद्र बांधणे व इतर कामाकरीता सुमारे 10 कोटी रुपये निधी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकायांचा आग्रहामुळे दिला आहे तसेच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे तूम्ही पदधिकारी तुमच्यातील व आमदार समाधान आवताडे यांच्यातील वाद मिटवून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना वरिष्ठांनी केल्याने आमदार समाधान आवताडे यांना पाटिंबा देण्याबाबत उपस्थित सर्वानी हात वर करून पाठिंबा दिला.
यावेळी मुजमिल काझी यांनी त्यांच्यावरील पदाधिकारी निवडीत झालेला अन्याय व शरद पवार गटांमध्ये उमेदवारीवरून शहरात सुरू असलेल्या आर्थिक देणे धेणे यावरती भाष्य केले. अजितदादांनी मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीसाठी जास्त जागा दिले आहेत व नुकत्याच राज्यपाल निवडणुकीत आमदार करून मुस्लिम समाजाला न्याय दिल्याने आम्ही यामुळे अजित दादा गटाचे काम करणार असल्याचे सांगून आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.
यावेळी ज्ञानेश्वर कोंडुभैरी, सोमनाथ बुरजे, ज्ञानेश्वर भगरे, शिवानंद पाटील,प्रवीण खवतोडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. राष्ट्रादी काँग्रेस अजित दादा गटाचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अजित जगताप यांनी पोट निवडणुकीनंतर कार्यकर्त्यासोबत झालेला अन्यायाबाबत भाष्य करून आपल्याला गेली दोन वर्ष शहराचा विकास करीत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठ्या प्रमाणात मदत केल्याची भावना व्यक्त केली.
सर्व पदाधिकारी व कार्यकत्यानी ज्या भावना व्यक्त केल्या त्यानुसार विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांना भविष्यात शहराच्या विकासासाठी पाठींबा देण्यावर वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र जगताप, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे,राहुल सावंजी,बशीर बागवान,सब्जपरी मकानदार,दीपक माने,ओबीसींचे जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार,माजी अध्य् मुझम्मिल काझी,संभाजी घुले किशोर दत्तू ,ज्ञानेश्वर कोंडुमैरी, बिलाल बागवान, सुभाष भंडारे , पिंटू मुरडे, राजेंद्र जाधव, अनिल मुदगुल, बाळू नागणे,विक्रम भगरे, विनायक द्तू ,हर्द डोरले ,रशीद तांबोळी, सिद्धर्थ लोकरे ,नागेश भगरे ,सागर खरबडे ,बशीर मुलाणी, शशीकांत साखरे, मिलिंद ढावरे माधुरी हजारे ,संगीता रजपूत, मेटकरी , चव्हाण आदि उपस्थित होते.