मंगळवेढा(प्रतिनिधी) :-
खते,मजुरी व इतर निविष्ठांची प्रचंड महागाई वाढलेली असताना, सर्वच शेतमाल व ऊसाला मात्र अजूनही २०१२ चाच दर मिळत आहे, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. अनेक साखर कारखानदार रिकव्हरी चोरून व काटा मारून शेतकऱ्यांची लूट करत आहेत, परंतु यापुढे अशा लुटारू साखर कारखानदारांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल,असे शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सिध्दाराम काकनकी यांनी मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे शेतकरी संघटनेच्या शाखा उद्घाटनानंतर शेतकरी मेळाव्यातून बोलताना सांगितले तसेच पूर्वी शेतकरी अशिक्षित असल्यामुळे अन्याय सहन करत होते परंतु शेतकऱ्यांची पोरं आता शिकून संघटित झालेली असल्यामुळे अशा लुटारू साखर कारखानदारांच्या गाड्या पेटवल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही असा गर्भित इशाराही काकणकी यांनी यावेळी बोलताना दिला.
शुक्रवारी रात्री नऊ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्तावित युवा आघाडी राज्य अध्यक्ष सिद्धाराम काकनकी यांनी केले तर आभार विशाल फरकंडे यांनी मानले तर सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष औदुंबर मोरे, सांगोला तालुका अध्यक्ष हनुमंत चौगुले, पंढरपूर तालुका अध्यक्ष सुभाष चौगुले, बार्शी तालुका अध्यक्ष सचिन आगलावे आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी सिध्दापूरच गावचे मा.सरपंच संतोष सोनगे, उपसरपंच सचिन चौगुले, सुनील बिराजदार, अमोगसिध्द काकनकी, महेश तळ्ळे, ओगेप्पा मलकारी, बाळासाहेब काकनकी, अंजुटगी सर, सागु मलकारी, गुरप्पा भरमगोंडे, सुनिल काकनकी, कोंडाजी तांबोळी, नैम तांबोळी, शांतय्या स्वामी, राकेश कपले, आपन्ना भरमगोंडे, अनिल काकनकी, प्रकाश भरमगोंडे, सिध्दाराम कोळी, मुदका कोळी, चंद्रकांत कोळी, सुनिल कोरे, युवराज कुरे, सागर खबाले, महादेव जाधव आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.